जाचक टोलमुळे नागरिकांना होणा-या त्रासाबद्दल सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या अत्यंत सन्मानीय व्यक्तीमत्त्वाला प्रखर मत करावे लागले, आता तरी सरकारने आपला शब्द पाळावा आणि टोलमुक्ती करावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी आज अनेक वाहिन्यांशी बोलताना केली.
मुंबई- जाचक टोलमुळे नागरिकांना होणा-या त्रासाबद्दल सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या अत्यंत सन्मानीय व्यक्तीमत्त्वाला प्रखर मत करावे लागले आहे. सरकारने टोलमुक्तीचा दिलेला शब्द पाळलेला नाही. आता तरी सरकारने आपला शब्द पाळावा आणि टोलमुक्ती करावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी आज अनेक वाहिन्यांशी बोलताना केली.
ख्यातनाम क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी टोलविरोधात आपले मत व्यक्त केले. त्यांच्या या जागरूकतेबद्दल समाधान व्यक्त करून श्री नितेश राणे यांनी वाहिन्यांशी बोलताना सांगितले की, हे सरकार कोणत्याच विषयात ठोस अशी भूमिका घेत नाही.
दिलेला कोणताच शब्द सरकार पाळत नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात येत नाहीत. लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे. सचिन तेंडुलकर यांना आता सरकारच्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त करावे लागले. आता तरी निदान सरकारने दिलेला शब्द पाळावा.
[EPSB]
टोलप्रश्नावरुन सचिनचे मुख्यमंत्र्यांना पत्र
टोलच्या प्रश्नामुळे मुंबईकरांना होणारा त्रास लक्षात घेत माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
[/EPSB]