नरेंद्र मोदी यांच्याकडून बॉम्ब फोडण्याची अपेक्षा करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी आता ‘मातोश्री’वर सुतळी बॉम्ब फोडावेत आणि त्यातच धन्यता मानावी’ असा टोला प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.
मुंबई- नरेंद्र मोदी यांच्याकडून बॉम्ब फोडण्याची अपेक्षा करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी आता ‘मातोश्री’वर सुतळी बॉम्ब फोडावेत आणि त्यातच धन्यता मानावी’ असा टोला प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भारत दौ-याला विरोध करणा-या शिवसेनेने अचानक घूमजाव करत शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना वेळ पडल्यास ते अणुबॉम्ब फोडतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर सावंत यांनी टोला लगावला.
भाजपने कधीही शिवसेनेच्या पाकिस्तानबाबतच्या धोरणाला फारशी किंमत दिलेली नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शिवसेनेने पाकिस्तानशी युद्धाला विरोध केला होता. त्या वेळी राज्यसभेत बोलताना वाजपेयींनी शिवसेना अतिरेक्यांपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले होते. वाजपेयींच्या काळात शिवसेनेला दहशवाद्यांपेक्षा अधिक अविश्वासार्ह मानणारी भाजप आता मोदींच्या काळात शिवसेनेला काय किंमत देत असेल, याबाबत न बोललेलेच बरे, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.