राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी दिलासा मिळाला आहे.
मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातून नाव वगळण्याची सीबीआयची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यावर सहा आठवड्यांची स्थगिती देण्यात आली आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे चव्हाण यांच्याविरुद्ध सत्र न्यायालयात फौजदारी खटला सुरु करता येणार नाही.
याआधी १९ नोव्हेंबर रोजी न्यायाधीश एम. एल. टहलियानी चव्हाण यांचे नाव वगळण्याचा सीबीआयचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यावर चव्हाण यांनी स्थगितीसाठी मोठ्या खंडपीठाकडे अर्ज दाखल केला होता. यासंदर्भातील पुढील सुनावणी जानेवारी २०१५मध्ये होणार आहे.
आदर्श घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने २०१२मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. यात अशोक चव्हाण यांच्यासह १३ जणांचा समावेश करण्यात आला होता.