ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ज्याची ओळख आहे त्या ‘टेकफेस्ट’ची सुरुवात शुक्रवारी २ ते ४ जानेवारीदरम्यान आयआयटी मुंबईत होत आहे.
मुंबई – ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ज्याची ओळख आहे त्या ‘टेकफेस्ट’ची सुरुवात शुक्रवारी २ ते ४ जानेवारीदरम्यान आयआयटी मुंबईत होत आहे.
यंदाच्या टेकफेस्टमध्ये २ हजार ५०० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे. यावेळी देशविदेशातील ५०० विद्यापीठातील सुमारे दीड लाखांच्या दरम्यान विद्यार्थी, तंत्रशास्त्र विषयातील तज्ज्ञ भेट देणार आहेत.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युक्रेन, झेक रिपब्लिक, कॅनडा आदी देशांतील विद्यार्थ्यांसह तज्ज्ञांनी तयार केलेले रोबोट आणि थ्रीडी माप्पिंग शो या टेकफेस्टचे खास आकर्षण असणार आहे. या उत्सवात नोबेल पुरस्कार विजेते अदा योनाथ, मंजुळ भार्गव यांच्यासह देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह फादर ऑफ इंटरनेट म्हणून ज्यांची ओळख आहे ते डॉ. विंट केर्फ, जावेद अख्तर आदी विविध विषयांवरील चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
तर पहिल्याच दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अर्जून कपूरही टेकफेस्टच्या उत्सवात सहभागी होणार आहेत. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात आयआयटीतील केवी मैदानात इंडियन आर्मीचे खास प्रदर्शन असेल. तर तिथेच डिजिटल आर्ट, तर सोम फोयर येथे व्हीएमसीसी येथे डिझाइन शो असतील.
टेक्नोहोलिक्समध्ये ओपन एअर थिएटर येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास मॉडर्न टाइम्स, तर एसएसी येथे नाईट एरेना हा खास कार्यक्रम असेल. तर आयडीसी अॅडिटोरियम येथे रोअर ही मैदानी व वेगवान गाडय़ाची शर्यत असेल. दुस-या आणि तिस-या दिवशीही धम्माल कार्यक्रमांसोबतच अनेक मान्यवरांकडून तंत्रज्ञानाच्या विषयावरील चर्चा ऐकण्याची संधी मिळणार आहे. शेवटच्या दिवशी डॉ. एपीजे अब्दुल कलाम, मंजूल भार्गव, सुभाष खोत यांचे विचार ऐकता येतील.