रत्येकाला हवाहवासा वाटणारा पाऊस या वर्षीच्या सुरुवातीला मनसोक्त बरसला नंतर मात्र रुसला. हा पाऊस आपल्या शब्दांत मांडणा-यांचा ‘बालकवी’ पुरस्कार देऊन ‘प्रहार’ने गौरव केला.
प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा पाऊस या वर्षीच्या सुरुवातीला मनसोक्त बरसला नंतर मात्र रुसला. हा पाऊस आपल्या शब्दांत मांडणा-यांचा ‘बालकवी’ पुरस्कार देऊन ‘प्रहार’ने गौरव केला.‘पाऊस’ विषयावर आधारित कविता पाठवण्याची संधी देणा-या ‘प्रहार’ने जूनच्या पहिल्या आठवडय़ात ही स्पर्धा जाहीर केली. त्यानंतर प्रहार कार्यालयात कवितांचा पाऊस पडला.
मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून तब्बल २ हजार ९०० कविता पाठवण्यात आल्या. यातील उत्तम कविता निवडण्याची जबाबदारी प्रख्यात कवी ह. शि. खरात आणि अरुण शेवते यांच्यावर सोपवण्यात आली.
निवडक २५९ कविता दैनिक ‘प्रहार’च्या अंकात प्रसिद्धही करण्यात आल्या. या विजेत्या कवींचा ह. शि. खरात, अरुण शेवते आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तुकाराम पाटील (पुणे), गंगाधर साळवी (महाड), संतोष खैरे (परळ), प्रशांत देसाई ( रत्नागिरी), संदीप नेवरेकर, अनुराधा आचरेकर (सिंधुदूर्ग) व दिपक आसेगावकर (यवतमाळ) या विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.