प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य
मुंबई – अकरावी प्रवेशापासून अद्याप हजारो विद्यार्थी वंचित आहेत. वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी ‘प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार अकरावी प्रवेशफेरी पार पडणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेप्रमाणे तीन गट करण्यात आले आहेत. या प्रत्येक गटानुसार दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेशाचा पर्याय प्रथम निवडणा-या विद्यार्थ्यांला रिक्त जागांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.
ही प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेप्रमाणे तीन गट करण्यात आले आहेत. या प्रत्येक गटानुसार दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेशाचा पर्याय प्रथम निवडणा-या विद्यार्थ्यांला रिक्त जागांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया येत्या २५ ऑगस्टपासून ते २ सप्टेंबपर्यंत राबवण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीनंतरही तब्बल ९ हजार ९ विद्यार्थी प्रवेशाविना वंचित आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसह कॉलेजमध्ये प्रवेश मिळूनही तो निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान ‘प्रथम प्राधान्य’ तत्त्वानुसार प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी ८० ते १०० टक्के, ६० टक्के आणि त्यावर गुण मिळवणारे आणि ३५ टक्क्यांवरील गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे तीन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. या प्रवेशप्रक्रियेपूर्वी कॉलेजांतील रिक्त जागांचा तपशील शनिवार, २५ ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
>> २५ ऑगस्ट : कॉलेजांतील रिक्त जागांचा तपशील वेबसाईटवर प्रसिद्ध होणार
>> २७ ऑगस्ट : गट क्रमांक १ मध्ये ८० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण असणा-या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित होणार
>> २७ ऑगस्ट आणि २८ ऑगस्ट : गट क्रमांक १च्या विद्यार्थ्यांनी सकाळी ११ ते ३ मध्ये कॉलेजात जाऊन प्रवेश निश्चित करणे
>> २८ ऑगस्ट : त्यानंतर संध्याकाळी
>> वाजता रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल
>> २९ ऑगस्ट : गट क्रमांक २ मध्ये ६० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण असणा-या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित होणार
>> २९ आणि ३० ऑगस्ट : सकाळी १० ते ३ या दरम्यान विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश घ्यावा लागणार
>> ३० ऑगस्ट : सायंकाळी ६ वाजता रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल
>> ३१ ऑगस्ट : गट क्रमांक ३ मध्ये ३५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण असणा-या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित होणार
>> ३१ ऑगस्ट : सकाळी १० ते ३ आणि १ सप्टेंबपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश घ्यावा लागणार
>> २ सप्टेंबर : सकाळी ११ वाजता ‘प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य’ दुस-या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.