बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावर निर्णय होईपर्यंत त्यांची मालमत्ता उद्धवला विकण्यास मनाई करावी, ही जयदेव ठाकरे यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावर निर्णय होईपर्यंत त्यांची मालमत्ता उद्धवला विकण्यास मनाई करावी, ही जयदेव ठाकरे यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे.
बाळासाहेबांच्या मृत्युपत्रात त्यांची मालमत्ता १४ कोटी नमूद केली आहे. बाळासाहेबांच्या मालमत्तेत वाटा नसलेल्या जयदेव यांनी या मृत्युपत्रावरच आक्षेप घेतला आहे. बाळासाहेबांचा वांद्रे येथील मातोश्री बंगलाच ४0 कोटी रुपयांचा असल्याचा दावा जयदेव यांनी केला आहे.
बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मृत्युपत्र प्रमाणित करण्यासाठी उच्च न्यायालयात ‘प्रोबेट’ दाखल केले आहे. या ‘प्रोबेट’ला जयदेव ठाकरे यांनी ‘नोटिस ऑफ मोशन’द्वारे आव्हान दिले होते.
त्यावर गुरूवारी सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने जयदेव यांची मागणी फेटाळून लावल्याने उद्धव ठाकरे यांचा ही मालमत्ता विकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.