तुम्हाला माहीत आहे का, या पृथ्वीवर विद्यमान आहे ती जागा जेथे साक्षात शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. उत्तराखंडाचे त्रियुगीनारायण मंदिरच ते पवित्र आणि विशेष पौराणिक मंदिर आहे. या मंदिरात शतकांपासून अग्नी जळत आहे. शिव-पार्वतीने या पवित्र अग्नीला साक्षी मानून विवाह केला होता. ही जागा रुद्रप्रयाग जिल्ह्याचा एक भाग आहे. त्रियुगीनारायण मंदिराबद्दल असे म्हटले जाते की, हे शिव-पार्वतीच्या शुभ विवाहाचे स्थळ आहे. मंदिरात प्रज्वलित अग्नी बऱ्याच युगांपासून जळत आहे म्हणून या स्थळाचे नाव त्रियुगी झाले. अर्थात अग्नी तीन युगांपासून जळत आहे.
त्रियुगीनारायण हिमावताची राजधानी होती. येथे शिव-पार्वतीच्या विवाहात विष्णूने पार्वतीच्या भावास्वरूप सर्व कार्य पार पाडले होते. जेव्हा की, ब्रह्म या लग्नात पुरोहित बनले होते. त्या वेळेस सर्व संत, मुनींनी या लग्नात भाग घेतला होता. विवाह स्थळाच्या नियत स्थानाला ब्रह्मशिला म्हटले जाते, जे मंदिराच्या समोर स्थित आहे. या मंदिराच्या महात्म्याचे वर्णन स्थळ पुराणातदेखील बघायला मिळते.
विवाहाअगोदर सर्व देवतांनी येथे स्नान केले होते. येथे तीन कुंड बनलेले आहे, ज्याला रुद्र कुंड, विष्णू कुंड आणि ब्रह्मा कुंड म्हणतात. या तिन्ही कुंडात पाणी सरस्वती कुंडातून येते. सरस्वती कुंडाचे निर्माण विष्णूच्या नासिकाद्वारे झाले होते, म्हणूनच अशी मान्यता आहे की, या कुंडात स्नान केल्याने स्तनहीनतेपासून मुक्ती मिळते.
जे कोणी भाविक या पवित्र स्थानाची यात्रा करतात, ते आपल्यासोबत तेथे प्रज्वलित अखंड ज्योतीचा अंगारा आपल्यासोबत घेऊन जातात. ज्याने त्यांचे वैवाहिक जीवनदेखील शिव- पार्वतीच्या कृपेमुळे नेहमी मंगलमय राहते.
वेदांमध्ये उल्लेख आहे की, हे त्रियुगीनारायण मंदिर त्रेतायुगात स्थापित झाले होते. जेव्हा की, केदारनाथ व बद्रीनाथ द्वापारयुगात स्थापित झाले. अशी मान्यतादेखील आहे की, या जागेवर विष्णूने वामन अवतार घेतला होता.
पौराणिक कथेनुसार इंद्रासन मिळवण्यासाठी राजा बलीला शंभर यज्ञ करायचे होते, त्यातून बलीने ९९ यज्ञ पूर्ण केले होते, तेव्हा विष्णूने वामन अवतार घेतल्याने बलीचा यज्ञ भंग झाला. येथे विष्णूची पूजा वामनच्या रूपात केली जाते. हे मंदिर सध्या चर्चेत आहे. असे म्हटले जाते की, येथे भारतातील मोठय़ा घराण्याचे लग्न होण्याची शक्यता आहे.