रिझव्र्ह बँकेने व्याज दरात अर्धा टक्का कपात केली आहे. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या उद्योगपतीं बरोबरच्या अनेक बैठका झाल्या होत्या. त्या बैठकांमध्ये उद्योगपतींनी मागणी लावून धरली होती ती व्याजदर कमी करण्याची होती.
देशभरातले मंदीचे वातावरण त्यामुळे दूर होईल, बाजारातली उलाढाल वाढेल, रोलिंगमध्ये पैसा वाढेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी कारणे त्यावेळी सांगितली जात होती. रघुराम राजन यांनी उद्योगपतींना स्पष्ट सुनावले होते की, सध्याच्या स्थितीत व्याजदर कमी होणार नाहीत. पंतप्रधानांना जेव्हा हे उद्योगपती भेटले होते तेव्हाही व्याजदर कमी करण्याची मागणी झाली होती; पण गव्हर्नरने ती मान्य केली नाही. आता अचानकपणे अर्धा टक्का व्याज दर कमी झाले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला किती गती मिळू शकेल, हे आज नक्की सांगता येणार नाही; पण निर्णय सकारात्मक आहे. बाजारपेठेवर याचा थोडासा अनुकूल परिणाम होईल. हे पाऊल रिझव्र्ह बँकेने उचलले आहे. आता बाकी बँका या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात, याच्यावर ब-याच गोष्टी अवलंबून आहेत. कारण मंगळवारी रिझव्र्ह बँकेने जाहीर केलेल्या चौथ्या पतधोरणात व्याजदर अध्र्या टक्क्याने कमी केला. आता हा दर ६.७५ टक्क्यांपर्यंत खाली घसरला असून साडेचार वर्षातली ही सगळय़ात निचांक पातळी आहे. या आर्थिक वर्षामध्ये रिझव्र्ह बँकेने १.२५ टक्क्याने रेपोदर घटवला आहे. कारण दसरा, दिवाळी हे खरेदीचे महत्त्वाचे सण आहेत. त्यामुळे बाजारात उत्साह राहील, अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात बाजारात भरभराट होते की नाही, हे समजायला काही काळ जावा लागेल. कामगार आणि कर्मचा-यांच्या हातात दिवाळीत बोनस नावाचे जे काही येते, त्या अवांतर पैशामुळे उलाढाल वाढत असते. त्याला अनुकूल वातावरण व्हावे म्हणून उत्पादित वस्तूंच्या किमती कमी होतील, असे गृहीत धरलेले आहे. त्यामुळे खरेदी वाढेल, असा बाजारपेठेचा अंदाज आहे. दसरा, दिवाळीच्या २० दिवसांत सामान्यपणे ३० टक्क्यापर्यंत ग्राहकांच्या खरेदीत वाढ होते, असा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे. ही आकडेवारी खरी ठरली तर सध्या मरगळलेल्या बाजारपेठेला काही प्रमाणात उभारी मिळू शकेल. असे प्रामुख्याने सांगितले जात आहे की, घर, वाहन, ग्राहकपयोगी वस्तू यात सध्या आलेल्या मंदीत व्याजदर कपात महत्त्वाची ठरेल. मात्र?अन्य बँकांनी अजूनही प्रतिसाद दिलेला नाही. उलट एक निरीक्षण असे आहे की, बँकांच्या किरकोळ कर्ज वितरणात गेल्या काही महिन्यांपासून मरगळ आहे. रेपो दर कपातीचा फायदा ग्राहकांना जर दिला, तर ग्राहकांच्या खिशावरचा भार कमी होईल, असे मानले जात आहे. त्यामुळे खरेदीसाठी हातात रक्कम शिल्लक राहील. मात्र?जे रघुराम आधी व्याजदर कपात करायला तयार नव्हते. त्यांनी ही कपात उद्योग क्षेत्राच्या दबावाखाली केली, असा आता मानले जात आहे. उद्योग क्षेत्राचा जो दबाव मोदींवर होता, तोच दबाव रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरवर आलेला दिसतो आहे. कारण काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी करायला नकार देताना याच गव्हर्नर साहेबांनी जी कारणे दिली होती, त्या कारणांमध्ये महागाई वाढीचे एक कारण होते आणि देशात झालेल्या कमी पावसाचे एक कारण होते आणि म्हणून उद्योग जगाची मागणी त्यांनी अमान्य केली. मग महिन्याभरात ही परिस्थिती कशी काय बदलली? त्याकरिता कुठून दबाव आला? शिवाय अर्धा टक्का कपातीने बाजाराची भरभराट होईल, हे आज अनुभवले जाणारे चित्र प्रत्यक्षात यायला वेळ लागणार आहे. कारण रेपो दरात कपात केली म्हणजे सरकारकडून पुरवठय़ामधले अडथळे दूर झाले नाहीत. त्यामुळे दबाव पुन्हा सरकारवर येणार आहे. अन्यथा गाजावाजा करून केलेली व्याजदर कपात किती फलदायी ठरले, याची मोठी शंका आहे.
कसोटीचा दौरा
अकरा वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारतात आला आहे. ७२ दिवसांचा हा खडतर दौरा आहे. या दौ-यात टी-२० चे तीन, पन्नास षटकांचे पाच आणि कसोटी सामने चार असे बारा सामने व्हायचे आहेत. भारतीय क्रिकेट संघाची पण या दौ-यात कसोटी लागणार आहे. जागतिक दर्जेदार क्रिकेट संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, एकेकाळचा वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि भारत या संघांचाच प्रामुख्याने समावेश केला जातो. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ गेला होता तेव्हा यजमानांनी ती मालिका जिंकली. तीन आणि दोन अशा फरकाने भारताने मालिका गमावली होती. आताही भारताच्या खेळपट्टय़ांवर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असले तरी भारतीय क्रिकेट संघाला हा दौरा फार जड जाण्याची गरज नाही. दक्षिण आफ्रिकेकडे आक्रमक असे तेज गोलंदाज आहेत. त्यात डेल स्टेन, मॉर्केल, मॉरीस, अॅबोट हे वेगवान गोलंदाज उसळत्या चेंडूचा मारा करू शकतील. या वेगवान गोलंदाजांसमोर खेळणे भारताला इंग्लंडमध्येही जड गेले होते. कसोटी क्रमवारीचा विचार केला तर दक्षिण आफ्रिका आज अव्वल स्थानावर आहे. त्यांच्याकडे मूळ भारतीय वंशाचा हाशीम अमला हा आघाडीचा फलंदाज आहे. डेव्हीड मिलन हा त्यांचा आक्रमक फलंदाज आहे आणि जे. पी. दुमणी हा त्यांचा अष्टपैलू खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यामानाने बराच समतोल आहे. मात्र भारतीय खेळाडूंची निवड करताना जुन्या खेळाडूंना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आलेले आहे. १५ पैकी १३ क्रिकेटपटू कसोटी संघातलेच आहेत. शिखर धवन-रोहित शर्मा, कोहली-रैना या दोन जोडय़ांवर भारतीय फलंदाजीची सगळय़ात मोठी भिस्त राहणार आहे. भारतीय हवामानात खेळण्याची फारशी सवय पाहुण्यांना नसली तरी पाहुणे चिवट आहेत आणि भारतीय भूमीत भारताचा पराभव करणे, यासाठी ते आलेले आहेत. आपण विश्वचषक विजेते असलो तरी बेभरवशाच्या या खेळात भारतीय संघाने हुरळून जाऊ नये, तरच विजय मिळेल. कोहलीने स्वत:वर संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण संघाचे संतुलन त्यामुळे बिघडू शकते. या दौ-याला भारतीय क्रिकेट रसिकांच्या शुभेच्छा अर्थातच भारतीय संघालाच आहेत.