मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ‘सर्व शिक्षा अभियानातंर्गत दरवर्षी नवीन पाठय़पुस्तके दिली जातात. परंतु पालिकेकडून दिलेली पुस्तके परत घेतली जात नाहीत.
मुंबई – मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ‘सर्व शिक्षा अभियानातंर्गत दरवर्षी नवीन पाठय़पुस्तके दिली जातात. परंतु पालिकेकडून दिलेली पुस्तके परत घेतली जात नाहीत.
उलट शैक्षणिक वर्षात नवीनच पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जातात. त्यामुळे ही पद्धत बंद विद्यार्थ्यांना दिलेली नवीन पुस्तके पुन्हा घेऊन पुढील वर्षी दुस-या विद्यार्थ्यांना द्यावीत. यामुळे पाठय़पुस्तक निर्मितीसाठी लागणारा खर्च होईल आणि कागद निर्मितीसाठी झाडांची होणारी कत्तल थांबून पर्यावरणाचेही संतुलन राखले जाईल, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके, गणवेश व इतर शालेय साहित्य मोफत पुरवले जाते. अशाचप्रकारे अमेरिकेसारख्या प्रगत देशातही शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत पुरवले जाते. परंतु त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सपंल्यानंतर ते साहित्य परत घेतले जाते आणि मग दुस-या विद्यार्थ्यांना दिले जाते.
त्याच धर्तीवर महापालिका शाळेत शैक्षणिक साहित्यांतर्गत देण्यात येणारी शालेय पाठय़पुस्तके परत घेऊन पुढील वर्षी दुस-या विद्यार्थ्यांना दिली जावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक परमिंदर भामरा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेकडे केली आहे.