शहरासह राज्यात मोठय़ा प्रमाणात साजरा होणा-या दहिहंडीत उंचच-उंच थरांना मर्यादा येण्याची चिन्हे आहेत.
मुंबई – शहरासह राज्यात मोठय़ा प्रमाणात साजरा होणा-या दहिहंडीत उंचच-उंच थरांना मर्यादा येण्याची चिन्हे आहेत. दहिहंडीच्यावेळी होणा-या अपघातांमुळे उच्च न्यायालयाने थरांवर मर्यादा आणण्याचे आणि लहान मुलांचा समावेश न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
न्यायाधीश व्ही. एम. कानडे आणि पी. डी. कोदे यांच्या पीठासमोर दहिहंडीच्या थरांची उंची आणि लहान मुलांच्या सहभागाबाबत स्वाती पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली.
मुंबई पोलिस कायदा किंवा अन्य कायद्याअंतर्गत १८ वर्षाखालील मुलांना दहीहंडी खेळण्यास मज्जाव करावा, याबाबतची अधिसूचना जारी करावी असे आदेशही न्यायालयाने दिले.