दिंडोशी विभागातील नागरी समस्या सोडवण्यात सदैव अग्रेसर असलेले राजहंस सिंह यांनी शांताराम तलावाचे रूपडे पालटवले आहे.
मुंबई – दिंडोशी विभागातील नागरी समस्या सोडवण्यात सदैव अग्रेसर असलेले राजहंस सिंह यांनी शांताराम तलावाचे रूपडे पालटवले आहे.शांताराम तलावाचे सौंदर्यीकरण करणारे राजहंस सिंह खरे लोकप्रतिनिधी असल्याची भावना स्थानिकांतून व्यक्त होत आहे. काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजहंस धनंजय सिंह यांच्या प्रचारसभेला शनिवारी वार्ड क्रमांक ३८ मधील साईबाबा मंदिर, अपना भंडार येथून सुरुवात झाली. त्यांनतर आंबेवाडी, महात्मा फुले नगर, हायवे व्ह्यू बिल्डिंग, जानू कंपाउंड, गौतम नगर, कोकणीपाडा, सिद्धेश्वर नगर, शांताराम तलाव भागातील सर्व परिसर त्यांनी पिंजून काढला.
पदयात्रेच्या दुस-या फेरीत सायंकाळी पालिका रुग्णालयापासून सुरुवात करत विठ्ठल मंदिर, मंगेश विद्या मंदिर, कोकणीपाडा, हेमंत निवास, पंचवटी चाळ, सुदेश हॉटेल, नूर मेन्शन चाळ, रेड्डी चाळ, गवत्या कंपाउंड, गणेशवाडी, न्यू गणेशवाडी, लक्ष्मण नगर, सेंट फ्रासिंस शाळा भागातील मतदारांशी संपर्क साधला. सर्व ठिकाणी राजहंस सिंह यांची स्थानिक महिलांनी ओवाळणी करत स्वागत केले.
राजहंस सिंह यांनी मागील विधानसभा निवडणुकीत विजयश्री मिळवल्यानंतर सिर्वप्रथम शांताराम तलावाला नवीन रूप देण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्यानंतर मुंबई जिल्हा नियोजन समितीतर्फे पाच कोटींचा निधी आणून सिंह यांनी दिंडोशीकरांना शांताराम तलावाचे दाखवलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार करून दाखवले. इतकेच नव्हेतर या तलावाला’ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव’ असे नाव दिले. त्यामुळे या भागात प्रचार करताना प्रत्येक जनतेकडून राजहंस सिंह यांच्या या कार्याचे कौतुक केले जात होते. तसेच ज्येष्ठांकडूनही त्यांना आशिर्वाद दिले जात होते.