राज्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. जवळपास १९ हजार ५९ गावे दुष्काळाचा सामना करत आहेत. त्यामुळे शेतक-यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे.
मुंबई – राज्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. जवळपास १९ हजार ५९ गावे दुष्काळाचा सामना करत आहेत. त्यामुळे शेतक-यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने राज्याला दुष्काळ निवारणासाठी ४ हजार ५०० कोटींची मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. त्याला मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळेल, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
टंचाईने होरपळलेल्या गावांसाठी सरकारने विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. त्याचा लाभ १९ हजार ५९ गावांना मिळेल. यात जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे रुपांतरण, शेती कर्ज वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सूट, परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे टँकर्स आणि शेत पंपांची वीज जोडणी खंडित न करणे अशा उपायांना करण्यात आल्या आहे.
टंचाईग्रस्त गावांना या सोयी उपलब्ध करून दिल्याच जातात. मात्र तातडीची अतिरिक्त मदत शेतक-यांना दिली पाहिजे, अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांकडून होत आहे. त्यामुळे राज्याने साडेचार हजार कोटींची मदत केंद्राकडे मागितली आहे.