गेल्या चार दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरु झालेला पाऊस पुढील दोन दिवसात आणखी सक्रीय होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मुंबई- गेल्या चार दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरु झालेला पाऊस पुढील दोन दिवसात आणखी सक्रीय होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. येत्या दोन दिवसात म्हणजेच ४८ तासांमध्ये मुंबईत मुसरधार पावसाची शक्यात असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नेओगुरी वादळ जपानच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्र आणि कोकण भागात सक्रीय होणार होण्याची शक्यता असल्याचे मुंबई हवामान विभागाचे महासंचालक व्ही.के.राजीव यांनी सांगितले.
गेल्या २४ तासांमध्ये दक्षिण मुंबईत १११.४ मिली मीटर पाऊस पडला आहे. तर इशान्य मुंबईत ४९.१ मिली मीटर पाऊस पडल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.