एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊ आणि यंदा ‘धूलिवंदन’च्या दिवशी पाण्याचा वापर न करण्याचा निर्णय घेऊ. ‘प्रहार प्रबोधन’च्या माध्यमातून आपल्याला ‘धूळवड खेळा पण पाण्याविना’ असे आवाहन करत आहोत.
धूळवड म्हणजे रंगांचा सण! या उत्साही सणाच्या दिवशी मुंबईतील अवघी तरुणाई रंगजल्लोषात न्हाऊन निघेल. पण, सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली आहे. पाण्याअभावी दुष्काळग्रस्त भागातील जनता हवालदिल झाली आहे. अशावेळी आपण पाण्याचा अपव्यय करणे कितपत योग्य ठरेल. जलव्यवस्थापन करणे ही आता महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे चला, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेऊ आणि यंदा ‘धूलिवंदन’च्या दिवशी पाण्याचा वापर न करण्याचा निर्णय घेऊ. ‘प्रहार प्रबोधन’च्या माध्यमातून आपल्याला ‘धूळवड खेळा पण पाण्याविना’ असे आवाहन करत आहोत. चला, ‘प्रहार’च्या या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा!