भिवंडीतील टेमघर-भादवड नाका येथे मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसाची जलवाहिनी फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेले.
भिवंडी- भिवंडीतील टेमघर-भादवड नाका येथे मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसाची जलवाहिनी फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेले. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. दरम्यान, सायंकाळी उशिरा मुंबई महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.
मुंबईची तहान भागवण्यासाठी ब्रिटिश राजवटीत १९२५ मध्ये तानसा तलावातून दोन जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. या जलवाहिन्या ठिकठिकांणी जीर्ण झाल्या आहेत. पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने अनेकदा जलवाहिन्या फुटून शेकडो लिटर पाणी वाया जाते. यामुळे मुंबईसह नजीकच्या परिसरात पाणी कपातीचे संकट निर्माण होण्याची शक्येता वर्तवण्यात येत आहे.