मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या प्रमुख तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने मुंबईतील पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
मुंबई – मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या प्रमुख तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने मुंबईतील पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. जूनच्या अखेरपर्यंत सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आली होती.
मात्र जुलैच्या दुस-या आठवडयापासून झालेल्या पावसाने मागची सर्व सरासरी भरुन काढल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणारे प्रमुख तलाव भरुन वाहू लागले. त्यामुळे मुंबईतील पाणी कपात मागे घेण्यात आली आहे.