मोदी सरकारने आता राज्यपालांवरही नवीन फतवे लादले आहेत.
नवी दिल्ली- मोदी सरकारने आता राज्यपालांवरही नवीन फतवे लादले आहेत. प्रत्येक राज्यपालांनी आपल्या राज्यात किमान २९२ दिवस राहणे गरजेचे असून त्यांना अन्यत्र प्रवास करायचा असल्यास राष्ट्रपतींची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.
तसेच प्रवासाबाबतचा तपशील त्यांनी एक आठवडाआधी राष्ट्रपती भवनाला पाठवायचा आहे. तसेच ही भेट खासगी किंवा अधिकृत आहे याची माहिती द्यायची आहे, आदी १८ कलमांची नियमावली जाहीर केली आहे. हे नियम केंद्रीय गृहखात्याने तयार केले आहेत.