राज्यातील मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत (११ तास) राहील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी शुक्रवारी दिली.
मुंबई : राज्यात १०, १७ आणि २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्यासाठी राज्यातील मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत (११ तास) राहील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी शुक्रवारी दिली.
राज्यातील निवडणूक पूर्व कामाचा आढावा घेण्यासाठी संपत यांनी विविध राजकीय पक्ष, मुख्य सचिव, पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. नक्षलग्रस्त भागात सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येईल.