‘रेल्वे अपघात वाढता वाढे’ या मथळ्याखाली ‘प्रहार’ने ५ नोव्हेंबरला वृत्त प्रसिद्ध केले होते, या वृत्ताची रेल्वे पोलिसांनी दखल घेतली असून, अपघात रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई- ‘रेल्वे अपघात वाढता वाढे’ या मथळ्याखाली ‘प्रहार’ने ५ नोव्हेंबरला वृत्त प्रसिद्ध केले होते, या वृत्ताची रेल्वे पोलिसांनी दखल घेतली असून, अपघात रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याअनुषंगाने रेल्वे पोलिस आयुक्तांनी, थेट पत्रकार, समाजसेवक आणि प्रवासी संघटनांकडूनच लेखी सूचना मागवल्या आहेत.
पदचारी पुलांचा न होणारा वापर आणि रूळ ओलांडणे अशा प्रकारांमुळे अवघ्या सहा महिन्यांत रेल्वे अपघातांतील मृतांची संख्या दोन हजार इतकी झाली होती. अपघातांचा हा आलेख वाढतच आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर दिवसाला १९ अपघात होतात. पैकी १० ते १५ जण या अपघातांत आपला जीव गमावतात. २०१४ या वर्षात आतापर्यंत एकूण २ हजार ६०८ अपघातांची नोंद झाली आहे. यातील ६३०हून अधिक मृतांची ओळख पटलेली नाही.
हे वाढते अपघात टाळण्यासाठी आता रेल्वे पोलिसांनीच जनजागृती करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार शाळा, कॉलेज, रेडिओ एफएम, रेल्वे स्थानकांवर होर्डिग लावणे, व्हॉट्सवर एखादी व्हीडिओ क्लिप बनवून जनजागृती करणे, स्थानकांदरम्यान पथनाटय़ सादर करण्यात येणार आहेत. तशी कल्पनाही रेल्वे पोलिसांना देण्यात आली असून, या सूचनांची लवकचर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलिसांच्या जनसंपर्क अधिका-यांनी सांगितले.