दररोज हजारो लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे.
मुंबई- दररोज हजारो लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. चर्चगेट स्थानकातील घटनेनंतर रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करत नसल्याचे समोर आले आहे.
रेल्वेच्या या अपघातात हानी टळली आहे. परंतु जर काही अनर्थ घडला असते तर याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घेतली असती का? असा सवाल अपघातात जखमी प्रवाशांनी उपस्थित केला आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर लोकल धडकून झालेल्या अपघातात मोटरमनसह इतर पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर जखमी झालेल्या दोघांना मुंबईच्या जी. टी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मोहम्मद फरिद व अनिता प्रशांत जलपूर अशी या जखमींची नावे आहेत. या अपघातात मोहंमद यांच्या मणक्याला किरकोळ दुखापत झाली होती. रुग्णालयात एक्स-रे काढण्यानंतर मणक्याला जास्त लागले नसून अनिता यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ही घटना भविष्यात पुन्हा घडणार नाही.
याबाबत कोणत्याही प्रकारशी शाश्वती देता येत नाही. त्यामुळे प्रवासांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोरणात्मक उपाययोजना करतील, अशी अपेक्षा प्रवाशांतून व्यक्त होत आहे.