माळीण गावावर डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रमाणे लवासा शहरावर देखील दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे भिती सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांनी सोमवारी व्यक्त केली.
पुणे- माळीण गावावर डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रमाणे लवासा शहरावर देखील दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे भिती सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांनी सोमवारी व्यक्त केली.
पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर ३० जुलै रोजी डोंगरकडा कोसळला होता. या दुर्घटनेत १०९हून अधिक जण ठार झाले आहेत. पाटकर यांनी सोमवारी दरड कोसळलेल्या माळीण गाव परिसराला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ‘लवासा’मध्येही मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड करण्यात आली आहे. तसेच मोठ्या दगड फोडणे आणि खनन करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
लवासा शहर उभे करताना पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप पाटकरांनी केला. यामुळे लवासामधील अनेक गावांवर भविष्यात दरड कोसळण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या.
राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी लवासा सारखी आणखी २६ शहरांची निर्माण करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. या प्रकल्पांना पाटकर यांनी विरोध केला. तसेच अशा शहरांना मंजुरी मिळू नये असेही त्या म्हणाल्या.