मुसळधार पावसामुळे मुलुंडमध्ये शुक्रवारी रात्री दोन मुले गटारात वाहून गेली तर शनिवारी भांडूप येथील एक महिला नाल्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे.
मुंबई- मुसळधार पावसामुळे मुलुंडमध्ये शुक्रवारी रात्री दोन मुले गटारात वाहून गेली होती. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आले आहे.
मुलुंड परिसरात शुक्रवारी रात्री दोन मुले गटारात वाहून गेल्याची घटना घडली. यापैकी एका मुलाला वाचविण्यात यश आले असले तरी दुस-या मुलाचा मृत्यू झाला आहे.
मुलुंड येथील अमर नगरमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास आफताब इरफान सय्यद (१५) मृत्युमुखी आणि अरबाज अंसारी (१२) हे दोघेजण खेळताना अचानकपणे जवळच्या गटारात पडले. यावेळी पाऊस पडत असल्यामुळे गटाराच्या पाण्याचा वेग खूप जास्त होता. दोघेजण पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना तेथील लोकांनी अरबाजला वाचविले. मात्र, इरफानला वाचविण्यात अपयश आले.
या दुर्घटनेत अरबाज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान शनिवारी भांडूप येथील प्रतापनगर परिसरातील एक महिला नाल्यात वाहून गेल्याचे वृत्त समजते. तर कुर्ल्यात दरड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
[EPSB]
पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत
पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्या असून मुंबईतील रस्ते वाहतूकही मंदावली आहे.
[/EPSB]
येत्या २४ तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.