लेखक अशोक वाटकर यांची ‘७२ मैल’ ही एक गाजलेली कादंबरी. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एका मुलाची आपलं जीवन समृद्ध करण्यासाठीची धडपड या कादंबरीतून आलेली आहे.
मुंबई – लेखक अशोक वाटकर यांची ‘७२ मैल’ ही एक गाजलेली कादंबरी. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एका मुलाची आपलं जीवन समृद्ध करण्यासाठीची धडपड या कादंबरीतून आलेली आहे. त्याचबरोबर ही कांदबरी तत्कालिन जीवन व ग्रामीण जीवनाचे अंतरंग उलगडते. या कादंबरीवर आधारीत नव्या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व अश्विनी यार्डी यांनी केली आहे. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमार हा हिंदी सिनेजगतातला अभिनेता पहिल्यांदाचं मराठी चित्रपटांच्या निर्मितीत उतरत आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे या चित्रपटाची प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय पातळीवर जनसंपर्काचे काम करणारी ‘स्टर्लिग’ ही मिडीया कंपनी सांभाळत आहे. लंडनमध्ये कार्यालय असलेल्या या कंपनीमार्फत आतापर्यंत अनेक बॉलीवुडपटाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जनसंपर्क सांभाळला जात होता.
या निमित्ताने ही कंपनीही पहिल्यांदाच मराठी चित्रपटाच्या जनसंपर्कातही उतरत आहेत. ७२ मैल हा केवळ व्यवसायिक चित्रपट नाही. तो एक कलात्मक चित्रपट असल्याने जगभरातल्या अनेक आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला जाण्याची शक्यता आहे.
आतंरराष्ट्रीय पातळीवरचा जनसंपर्क हा या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सहाय्यक ठरू शकेल असा विश्वास निर्मात्यांना वाटल्यामुळे त्यांनी ही जनसंपर्क संस्था निवडली असावी. या निमित्ताने ‘ग्लोबल व्हिलेज’ या इंग्रजी शब्दात अभिप्रेत असलेली व्याख्या प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. गेल्या काही वर्षात अनेक मराठी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला असला तरी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या चित्रपटांची काहीशी अभावानेचं दखल घेतली आहे.
‘श्वास’ हा चित्रपट जेव्हा ऑस्करसाठी निवडण्यात आला होता त्यावेळी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रेक्षकांच्या समोर आणण्यासाठी आवश्यक जनसंपर्काची चिंता निर्मात्यांना होती. ७२ मैल या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमार व अश्विनी यार्डी या निर्मात्यांनी मराठी चित्रपटांसाठीही एक नवे दालन खुले करून दिले आहे.
साहित्यावर चित्रपट येताहेत हे चांगलेच. एरवी मराठीत चांगले साहित्य असतानाही शिनेमावाले आपल्या त्चयाच त्या पटकथा पाडत राहातात.