गेल्या २५ वर्षात सिंधुदुर्ग जिल्हय़ाने विकासाची घेतलेली भरारी तुम्ही अनुभवली आहे. मात्र गेल्या आठ महिन्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जिल्हा विकासाची प्रक्रिया ठप्प आहे.
सिंधुनगरी – गेल्या २५ वर्षात सिंधुदुर्ग जिल्हय़ाने विकासाची घेतलेली भरारी तुम्ही अनुभवली आहे. मात्र गेल्या आठ महिन्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जिल्हा विकासाची प्रक्रिया ठप्प आहे. ‘अच्छे दिन’चे व महागाई कमी करण्याचे स्वप्न दाखवून भाजपा-शिवसेनेने जिल्हावासीयांची, राज्य व देशातील जनतेची फसवणूक केली.
त्याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसने सिंधुदुर्गात जोरदार मोर्चा काढला. यापुढे कोकणावर अन्याय सहन केला जाणार नाही. येत्या ऑक्टोबर -नोव्हेंबरपर्यंत चिपी विमानतळावरून विमानाचे उड्डाण न झाल्यास एकाही मंत्र्याचे हेलिकॉप्टरचे जिल्ह्यात उतरू देणार नाही, असा खणखणीत इशारा माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिला.
ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिराकडून थेट जिल्हाधिकारी भवनावर हा मोर्चा गेला. त्यानंतर नारायण राणे यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी मार्गदर्शन केले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेत निवेदन सादर के ले. या मोर्चात सजविलेल्या बैलगाडीवर आरुढ होत नारायण राणे सहभागी झाले होते.
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या गैरकारभारावर टीका करताना राणे म्हणाले की, सिंधुदुर्गचा विकास थांबवण्यासाठी भाजपाचे मंत्री केंद्रात कटकारस्थाने करत आहेत. गोव्यातील मंत्री अधिकच सक्रिय आहेत. चिपी विमानतळाची धावपट्टी मी गोव्याच्या विमानतळापेक्षा मोठी मंजूर करून घेतल्याने त्यांना हा विमानतळ नको.
भ्रष्टाचाराने माखलेली माणसे नव्या सरकारमध्ये आहेत. शिवसेनेने गेल्या २२ वर्षात मुंबई शहर बकाल केले आहे आणि आता तेच राज्यात एक हाती सत्ता देण्याची मागणी करत आहेत. शिवसेना-भाजपा रोज भांडताहेत, एकमेकांवर रोज लाथा मारण्यापेक्षा राजकीय घटस्फोट घ्या. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्ता मिळविणा-यांचे बुरे दिन आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. राज्यात दौरा करून सत्ताधा-यांच्या भ्रष्टाचाराची कुंडली जनतेसमोर मांडणार, असा इशाराही राणे यांनी दिला.
कोकणी जनतेवर होणा-या अन्यायावर कोकणातील मंत्री काहीच बोलत नाहीत. सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांना काहीच कळत नाही. सिंधुदुर्गातील प्रत्येक काम आणि त्यासाठी लागणारा निधी नारायण राणे यांनीच दिला आहे. मी १०० कोटींचा निधी जिल्ह्यात आणला. आता तो नव्या मंत्र्यांनी आणून दाखवावा. जिल्ह्याचा विकास थांबेल आणि मी त्यासाठी मोर्चा काढेन, असे मी स्वप्नातही पाहिले नव्हते. मात्र ते दुर्दैवाने करावे लागत आहे. येथील जनतेला रेशन धान्य दुकानावर रेशन नाही. सी-वर्ल्ड, चिपी विमानतळ ही महत्त्वाची कामे थांबली. सरकारी योजनांचा लाभ जनतेला मिळत नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे. घरात पैसा आणि अन्न नसल्याने भुकबळी जावू लागले. मात्र, मुख्यमंत्री परदेश दौरे करत आहेत. भाजपातील एक तरी मंत्री दाखवा जो भ्रष्टाचारापासून मुक्त आहे, असे आव्हान राणे यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा सुखी आणि समृद्ध केल्याशिवाय मी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. हा जिल्हा अधोगतीकडे जावू देणार नाही. गेली १५ वर्ष सत्तेपासून दूर असल्याने सरकारमधील सगळेच मंत्री सत्तेवर तुटून पडलेले आहेत. एमआयडीसीच्या पैशातून मुख्यमंत्री पत्नीसमवेत परदेश दौरे करतात. त्यांनी मुख्यमंत्री पदाची शान घालविलेली आहे.
यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवापर्यंतचे प्रत्येक मुख्यमंत्री या पदाची शान उंचावेल या पद्धतीचे काम करत होते. मात्र विद्यमान मुख्यमंत्री फार बालिश आहेत. कोठे झोपावे आणि कोठे काय करावे याचेही त्यांना भान नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
सिंधुदुर्गात जिल्हय़ात एकही शेतकरी आत्महत्या करीत नव्हता. आता देवगड तालुक्यात आंबा बागायतदारावर आत्महत्येची वेळ आली. भूसंपादनाचे नवीन विधेयक केंद्र सरकार मंजुर करीत असून शेतक-यांच्या जमिनी या कायद्यानुसार घेऊन त्या धनदांडग्यांना देण्याचा सरकारचा डाव आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या, भुकबळी यांच्यासह कायदा आणि सुव्यवस्थेसाठी प्रश्न निर्माण झाला आहे, असे राणे यांनी सांगितले.
जिल्हावासीयांची खदखद विराट मोर्चातून व्यक्त
जिल्हाधिकारी भवनावर काढलेल्या काँग्रेसच्या धडक मोर्चात जिल्हय़ातील शेतकरी व जिल्हावासिय हजारोंच्या संख्येने भरपावसात हजर होते. या मोर्चात महिलांचाही मोठा सहभाग होता. माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मोर्चाचे नेतृत्व केल्याने मोर्चातील लक्षणीय उपस्थिती ऐतिहासिक ठरली. ठप्प झालेला विकास, जनतेचे रखडलेले प्रश्न, वाढती महागाई आदीबाबत लक्ष वेधतानाच सरकारकडून जनतेची फसवणूक झाल्याचा जाबही मोर्चातून विचारला.
या मोर्च्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतिश सावंत, जि.प.चे अध्यक्ष संदेश सावंत, सौ.अस्मिता बांदेकर, जयेंद्र परुळेकर, जि.प.चे उपाध्यक्ष रणजित देसाई, मधुसुदन बांदिवडेकर, प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, जि.प.व पं.स सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिका-यांनीही काँग्रेसची ताकद दाखविली.
शेतक -यांनी कामे बंद ठेऊन केला सरकारचा निषेध
शेतक-यांनी शेतीची कामे बंद ठेवत या मोर्चात सहभाग घेतल्याने नारायण राणे, सतिश सावंत व सर्वच पदाधिका-यांनी शेतकरी जनतेचे आभार मानत धन्यवाद दिले. जिल्ह्यातील विविध विकामे, प्रकल्प राज्य सरकारने रोखून धरले आहेत.
आंबा काजू बागायतदारांना पुरेशी नुकसान भरपाई मिळत नाही. जिल्हय़ातील मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचे धोरणात्मक निर्णय नाहीत. वाळू, चिरे, खडीवर वाढलेली रॉयल्टी व मोठय़ा रकमेच्या दंडात्मक कारवाईमुळे या व्यवसायांवरही गदा आली आहे. विकसित आणि प्रगत जिल्हय़ाशी स्पर्धा करणारा सिंधुदुर्ग आता मागे पडत आहे. विकासाबाबत सरकारच्या उदासिन भूमिकेमुळे सिंधुदुर्गचे मोठे नुकसान होत आहे.
पोलिसांचा जाणिवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न
निवेदन देण्यासाठी काँग्रेसचे आठ तालुक्याचे आठ अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी जिल्हाधिका-यांच्या दालनात जात असताना पोलिसांनी त्यांना अटकाव केला. हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत हे सांगूनही प्रवेशद्वारावर पोलिसांनी त्यांना मागे खेचले. यावेळी शाब्दीक बाचाबाची झाली. काँग्रेस प्रदेशचे सदस्य विकास सावंत, जिल्हा काँग्रेसचे सदस्य नासीर काझी, एकनाथ नाडकर्णी, मनिष दळवी यांना दालनाबाहेरच रोखण्यात आले. त्यामुळे पोलीस आणि पदाधिकारी यांच्यात शाब्दीक जुंपली. काँग्रेसच्या यशस्वी मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. राजकीय वाद निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या वृत्तीचा आपण निषेध करतो. पोलिसांचा धिक्कार करतो, अशा शब्दात विकास सावंत यांनी पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेचा निषेध नोंदविला.
जिल्हावासीयांची खदखद मोर्चातून व्यक्त
जिल्हाधिकारी भवनावर काढलेल्या काँग्रेसच्या धडक मोर्चात जिल्हय़ातील शेतकरी व जिल्हावासीय हजारोंच्या संख्येने भरपावसात हजर होते. या मोर्चात महिलांचाही मोठा सहभाग होता. माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मोर्चाचे नेतृत्व केल्याने मोर्चातील लक्षणीय उपस्थिती ऐतिहासिक ठरली. ठप्प विकास, जनतेचे रखडलेले प्रश्न, वाढती महागाई आदींबाबत लक्ष वेधतानाच सरकारकडून जनतेची फसवणूक झाल्याचा जाबही मोर्चातून विचारला.
या मोर्चाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जि.प.चे अध्यक्ष संदेश सावंत, सौ. अस्मिता बांदेकर, जयेंद्र परुळेकर, जि.प.चे उपाध्यक्ष रणजित देसाई, मधुसूदन बांदिवडेकर, प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, जि.प.व पं.स सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिका-यांनीही काँग्रेसची ताकद दाखविली.
शेतक-यांनी कामे बंद ठेऊन केला सरकारचा निषेध शेतक-यांनी शेतीची कामे बंद ठेवत या मोर्चात सहभाग घेतल्याने नारायण राणे, सतीश सावंत व सर्वच पदाधिका-यांनी शेतकरी जनतेचे आभार मानत धन्यवाद दिले. जिल्ह्यातील विविध कामे, प्रकल्प राज्य सरकारने रोखून धरले आहेत.
आंबा, काजू बागायतदारांना पुरेशी नुकसानभरपाई मिळत नाही. जिल्हय़ातील मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचे धोरणात्मक निर्णय नाहीत. वाळू, चिरे, खडीवर वाढलेली रॉयल्टी व मोठय़ा रकमेच्या दंडात्मक कारवाईमुळे या व्यवसायांवरही गदा आली आहे.
विकसित आणि प्रगत जिल्हय़ाशी स्पर्धा करणारा सिंधुदुर्ग आता मागे पडत आहे. विकासाबाबत सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सिंधुदुर्गचे मोठे नुकसान होत आहे.
पोलिसांचा जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न
निवेदन देण्यासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी जिल्हाधिका-यांच्या दालनात जात असताना पोलिसांनी त्यांना अटकाव केला. हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत हे सांगूनही प्रवेशद्वारावर पोलिसांनी त्यांना मागे खेचले.
यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. काँग्रेस प्रदेशचे सदस्य विकास सावंत, जिल्हा काँग्रेसचे सदस्य नासीर काझी, एकनाथ नाडकर्णी, मनीष दळवी यांना दालनाबाहेरच रोखण्यात आले. त्यामुळे पोलीस आणि पदाधिकारी यांच्यात शाब्दिक जुंपली.
काँग्रेसच्या यशस्वी मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. राजकीय वाद निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या वृत्तीचा आपण निषेध करतो. पोलिसांचा धिक्कार करतो, अशा शब्दांत विकास सावंत यांनी पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेचा निषेध नोंदविला.