कोकण मंडळाद्वारे ४ हजार २७५ घरांसाठीची सोडत काढण्यात येणार असून यासाठी १ लाख ३४ हजार १२४ अर्ज आले आहेत.
मुंबई – म्हाडाच्या यंदाच्या सोडतीत आपला नंबर लागेल की नाही, अशी हुरहूर प्रत्येक अर्जदाराच्या मनाला लागून आहे. कोकण मंडळाद्वारे ४ हजार २७५ घरांसाठीची सोडत काढण्यात येणार असून यासाठी १ लाख ३४ हजार १२४ अर्ज आले आहेत. म्हाडाद्वारे १६ फेब्रुवारी रोजी स्वीकृत अर्जदारांच्या नावांची प्रारूप यादी सोडतीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती.
१९ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वाजता स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी सोडतीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांची नावे अर्जातील काही चुकांमुळे यादीत प्रसिद्ध झाली नाहीत अशा अर्जदारांसाठी हरकती नोंदवायला आणि चुका दुरुस्तीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी कोकण मंडळाद्वारे घरांची सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीत समाविष्ट अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी म्हाडाने १६ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वाजता सोडतीच्या संकेतस्थळावर स्वीकृत अर्जदारांच्या नावांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली होती. अर्जामध्ये अपेक्षित माहिती न भरल्याने, अनामत रक्कम भरण्यात चूक आदी कारणांमुळे अशा अर्जदारांचे अर्ज तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत. अशा अर्जदारांना हरकत नोंदवत चुका दुरुस्तीसाठी १९ फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी आहे. दिलेल्या मुदतीपर्यंत अर्जदाराने चुका दुरुस्त केल्या नाहीत तर त्याचा अर्ज कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याचे म्हाडा अधिका-यांद्वारे सांगण्यात आले.