कोपरखैरणे येथे तांत्रिक बिघाडामुळे हार्बर आणि अंबरनाथ येथे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे.
ठाणे- कोपरखैरणे येथे तांत्रिक बिघाडामुळे हार्बर आणि अंबरनाथ येथे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणा-या धीम्या मार्गावरील सर्व गाड्या सुमारे अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. रेल्वे अधिकारी व कर्मचारी दुरुस्ती कामासाठी घटनास्थळी पोहचले आहेत.
या आठवड्यात मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडाची ही तिसरी घटना आहे. मध्य रेल्वेवरील बदलापूर स्थानकाजवळ सीएसटीकडे येणा-या लोकल ट्रेनचा पेंटाग्राफ बुधवारी तुटल्याने कर्जत ते कल्याण दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यापूर्वी मंगळवारी दिवा स्थानकाजवळ लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने येणा-या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते.