५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्यानंतरही नवीन काळा पैसा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुंबई- ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्यानंतरही नवीन काळा पैसा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांमुळे काळा पैसा अधिक जमा करणे सोपे झाले आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
आता लाचखोरही दोन हजारांच्या नवीन नोटांच्या माध्यमातून लाच मागत आहेत. मोदी आपल्या मित्र उद्योजकांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत सरकारची भूमिका प्रामाणिक नाही हे स्पष्ट होईल.