गंभीर आरोपांमुळे वारंवार विरोधकांचे लक्ष्य ठरलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या ‘रामटेक’ या शासकीय बंगल्याला रामराम करीत मूळ गावी जळगावात मुक्काम हलवला आहे.
मुंबई- गंभीर आरोपांमुळे वारंवार विरोधकांचे लक्ष्य ठरलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या ‘रामटेक’ या शासकीय बंगल्याला रामराम करीत मूळ गावी जळगावात मुक्काम हलवला आहे.
मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता धुसर झाल्यानेच खडसेंनी रामटेक बंगला सोडण्याचे बोलले जाते.
भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरण, खडसेंचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील याला लाच मागल्याप्रकरणी मंत्रालयात अटक, आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम फोन प्रकरण अशा अनेक गंभीर आरोपांमुळे खडसे विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरले.
मंत्रीपद सोडल्यानंतर साधारण सहा ते सात महिन्यांत मंत्री मुक्काम हलवतात. तरीही आपणास क्लीनचिट मिळेल आणि आपण परत मंत्रिमंडळात येऊ या अपेक्षेने खडसे ‘रामटेक’मध्येच थांबले होते.