एकीकडे घरांच्या किमती वाढल्यात, तर दुसरीकडे इंधन दरवाढ थांबायचे नाव घेत नाही. मुंबईत पेट्रोलने ८० रुपयांचा टप्पा गाठला आहे.
मुंबई- एकीकडे घरांच्या किमती वाढल्यात, तर दुसरीकडे इंधन दरवाढ थांबायचे नाव घेत नाही. मुंबईत पेट्रोलने ८० रुपयांचा टप्पा गाठला आहे. पेट्रोलचे दर महाराष्ट्रात अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. त्याचे कारण म्हणजे सरकारने सुरू केलेला दुष्काळ कर. यंदा राज्यात दुष्काळाची स्थिती नाही, तरीही दुष्काळ कर का वसूल केला जातोय, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारीत आहेत.
उजनी धरण भरले आहे, तर चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. कधी नाही ते मराठवाडय़ातील जायकवाडी तुडुंब आहे. पण सरकारच्या लेखी मात्र महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळेच वाहनधारकांकडून १ लिटर पेट्रोलमागे तब्बल ११ रुपये दुष्काळ कर वसूल करून घेतला जात आहे.
गेल्या दोन वर्षापासून दुष्काळाच्या नावाखाली सरकार सर्वसामान्य जनतेचा खिसा कापत आहे. राज्यात सध्या सरासरी ७५ रुपये लिटरने पेट्रोल मिळते. यातील ११ रुपये कमी झाले तर फक्त ६४ रुपयाने तुम्हाला पेट्रोल मिळू शकेल. त्यामुळे ११ रुपयांनी पेट्रोलचे दर स्वस्त झाले तर ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकेल. विदर्भ, मराठवाडय़ात दुष्काळ असताना सरकारने पेट्रोलवर कर लावून नुकसान भरून काढले.
लोकांनीही शेतक-यांच्या हितासाठी सरकारला साथ दिली. पण आता दुष्काळ नसतानाही सरकार लोकांची लूट का करतेय, असा प्रश्न विचारला जात आहे. विरोधात असताना पेट्रोल एका रुपयानेही वाढले की फडणवीस बैलगाडी घेऊन आंदोलन करायचे, तर पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी दिल्लीवर निशाणा साधायचे. आता क्रूड ऑईलच्या दरांनी तळ गाठला असतानाही ही लूट लोकांनी का सहन करायची? असा प्रश्न आहे.
[EPSB]
पक्षांतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती होईल, असे सांगत पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनी येत्या महिन्याभरातच हा बदल होण्याचे संकेत शुक्रवारी दिले.
[/EPSB]