एकूण लोकसंख्येपैकी ३१ टक्के मुंबईकर तणावाखाली जीवन जगत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. ‘लीब्रेट’ या डॉक्टरांच्या ऑनलाईन सल्लागार संस्थेने हा सव्र्हे केला आहे.
मुंबई- एकूण लोकसंख्येपैकी ३१ टक्के मुंबईकर तणावाखाली जीवन जगत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. ‘लीब्रेट’ या डॉक्टरांच्या ऑनलाईन सल्लागार संस्थेने हा सव्र्हे केला आहे. तसेच संपूर्ण देशातल्या महत्त्वाच्या शहरांमधील ६० टक्के नागरिक हे तणावाखाली जगत असल्याचेही यात म्हटले आहे.
या सव्र्हेनुसार, मुंबईतल्या नोकरदार वर्गातील व्यक्तींचे तणावाचे मुख्य कारण अपुरा वेळ, दिलेले काम वेळेत पूर्ण करू न शकणे, मानसिक तणावाशी संघर्ष, ऑफिसमधील राजकारण, ओव्हर टाईम काम करणे, तसेच प्रोफेशनल जीवन आणि वैयक्तीक जीवनात योग्य संतुलन नसल्याची मुख्य कारणे आहेत. ‘लीब्रेट’ संस्थेचे सीईओ आणि संस्थापक सौरभ अरोडा यांनी याबाबत सांगितले की, ‘तणावाखालील व्यक्तींना आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी बोलताना नेहमी अस्वस्थता जाणवते. पण आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी आपले विचार, आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करणे गरजेचे आहे.’ ट्रेनमध्ये, बसमध्ये, रस्त्याने किंवा घरातही प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. सोशल मीडियाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याने प्रत्येकजण स्वत:मध्येच गुंतलेला आहे. मोबाईलच्या वापरामुळे घरातही व्यवस्थित संवाद होत नाही. त्यामुळे आपण तणावाखाली जातो.
ऑफिसमधील काम झाल्यानंतर घरी जाताना तुम्ही प्रवासात ट्रॅफिकमध्ये अडकता किंवा ट्रेनचा तांत्रिक गोंधळ होतो आणि चिडचिड होणे सुरु होते. अगदी काही सेकंदाचा सिग्नल लागलेला असेल तरीही तो नकोसा वाटतो. अशा वेळी संयम आणि शांततेने राहणे हा एकमेव मार्ग आहे. त्यानंतर घरी गेल्यानंतर मोबाईलमध्ये अडकून न राहता कुटुंबियांशी संवाद साधला तर तणाव दूर होण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ताणतणावामुळे रक्तदाब, त्वचेचे विकार, हृदयविकाराचा झटका असे आजारही वाढत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
स्वत:च्या विकासासाठी तणाव गरजेचा आहे. आयुष्यात तणाव नसता तर माणसाने प्रगतीच केली नसती. तणाव येऊ नये म्हणून आपण काळजी घेतो आणि बुद्धी वापरतो. त्याचाच फायदा स्वत:च्या विकासासाठी होतो. मात्र या सगळ्यात नियोजन महत्त्वाचे आहे, असे डॉ. आशिष देशपांडे यांचे म्हणणे आहे. ऑफिसमध्ये काम करताना खाण्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. खासगी क्षेत्रात कामकाजाच्या वेळेत ही काळजी घेणे ब-याचदा शक्य होत नाही. त्यामुळे खारट, मसालेदार आणि चटपटीत पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. वेळेवर खाणे शक्य नसेल तर सकाळचा नाष्टा महत्त्वाचा आहे. तो चांगला करावा, रात्रीचे जेवण कमी करावे. झोप महत्त्वाची आहे. किमान सात ते आठ झोप गरजेची आहे. झोप न घेतल्यास अॅसिडिटीसारखे प्रॉब्लेम होतात आणि तणाव आणखी वाढतो.
जास्त तणाव जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, असेही डॉक्टर सांगतात. ज्या व्यक्तीचे बालपण स्वकेंद्रित गेलेले आहे, म्हणजे ज्याला कधी नकार ऐकण्याची सवय नाही, ज्याला कधी कुणी उलट बोललेले नाही, अशा व्यक्तींना ऑफिसमध्ये टीमसोबत काम करताना अडचणी येतात. ऑफिसमध्ये सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होणे शक्य नाही. मॅनेजर आणि कर्मचारी यांच्यात थोडासा तणाव असणे स्वाभाविक आहे. समुपदेशन घेण्यासाठी हेल्पलाईन आहेत. तुम्ही घरबसल्या तुमची अडचण त्यांना सांगून सल्ला घेऊ शकता, असेही डॉक्टर आशिष देशपांडे यांचे म्हणणे आहे.
[EPSB]
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांची यंदाची दिवाळी जोरात असणार आहे.
[/EPSB]