सर्व विक्रम मोडणा-या, सर्व सीमा ओलांडणा-या आणि प्रेक्षकांना नि:शब्द करणा-या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि निर्माते नितीन केणी यांना भेटल्यानंतर व्हिसलिंग वूडस इंटरनॅशनलचे (डब्ल्यूडब्ल्यूआय) विद्यार्थी मंगळवारी सायंकाळी आनंदित झाले होते.
सर्व विक्रम मोडणा-या, सर्व सीमा ओलांडणा-या आणि प्रेक्षकांना नि:शब्द करणा-या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि निर्माते नितीन केणी यांना भेटल्यानंतर व्हिसलिंग वूडस इंटरनॅशनलचे (डब्ल्यूडब्ल्यूआय) विद्यार्थी मंगळवारी सायंकाळी आनंदित झाले होते. चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी विद्यार्थी उपस्थित होते आणि त्यानंतर नितीन आणि नागराज यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
चित्रपटाचा शेवट पाहून स्तीमित झालेल्या विद्यार्थ्यांना, ‘‘राष्ट्रीय पुरस्कारविजेता पिस्तुल्या असो किंवा फँड्री किंवा सैराट, नागराज मंजुळे यांचे सिनेमे प्रेक्षकांवर इतका परिणाम कसा काय करतात?’’ याचे नवल वाटते. याचे उत्तर देताना नागराज यांनी त्यांच्या शालेय जीवनातील एक प्रसंग सांगितला. त्यांच्यासोबतच्या एका विद्यार्थ्यांने त्यांना फँड्री असे संबोधले. त्यांच्या जातीशी संबंधित असलेले अपमानकारक शब्द प्रथमच त्यांना कुणीतरी इतक्या जाहीरपणे ऐकवले होते.
फँड्री हे त्यांच्या पहिल्या फीचर फिल्मचे शीर्षक बनले. तसेच, सैराट सिनेमातील अनेक भागही त्यांच्या जीवनावर बेतलेले आहेत. त्यांनी असेही सांगितले, ‘‘सैराट म्हणजे माझ्या जीवनात मी अनुभवलेल्या विविध प्रश्नांना दिलेला प्रतिसाद आहे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘खलनायक हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा त्यासाठी १० रुपयांचे तिकीट होते. त्या वेळी मला ते परवडले नाही.
परंतु, तो चित्रपट पाहण्यासाठी मी इतरांकडून पैसे उधार घेतले. मला हिंदी सिनेमा मनोरंजक वाटतात. सुभाष घई यांचे चित्रपट मी एखाद्याचा चाहत्याप्रमाणे पाहिले आणि आज त्यांच्या व्हिसलिंग वूड्स या संस्थेत येऊन तुमच्याशी संवाद साधताना मला माझा गौरव झाल्यासारखे वाटते.’’ त्यांनी नमूद केले, ‘चित्रपट केवळ मनोरंजनासाठी बनवले जात नाहीत, आपले विचार समाजासमोर मांडण्यासाठी हे एक माध्यम आहे.’
सलिंग वूड्स इंटरनॅशनल येथे निर्माते व दिग्दर्शक आल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे नमूद करून, डब्ल्यूडब्ल्यूआयचे अध्यक्ष व संस्थापक सुभाष घई यांनी सांगितले, ‘‘हा चित्रपट मी माझ्या मित्रमंडळींसोबत पाहिला. तो प्रचंड यशस्वी होईल, असे मी म्हणालो होतो आणि तसा तो झालाही.’’ या चर्चेमध्ये, चित्रपटाच्या प्रक्रियेतील तांत्रिक बाबींवर, तसेच अन्य समस्यांवरही बोलणे झाले, जसे की जातीवाद, वर्गवाद व ऑनर किलिंग, लैंगिक समानता.
या सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय का घेतला, याविषयी त्यांनी सांगितले, ‘इतक्या जिद्दीने बनवलेल्या ‘सैराट’सारख्या सिनेमांची प्रसिद्धी करायला हवी. अशाप्रकारे कथा विषद करणा-यांसाठी आणखी व्यासपीठे उपलब्ध करायला हवीत’ असेही म्हणाले.
‘मला केवळ कथाच आवडली नाही, तर त्यातील पात्रांच्या मी प्रेमात पडलो. यामुळेच मी सैराट या चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले.’ हे सत्र उत्साह आणि मोलाच्या शिक्षणाने भरलेले होते. सत्राच्या शेवटी, सुभाष घई यांनी पाहुण्यांचा प्रेम आणि कौतुकाने सत्कार केला. तसेच, या प्रचंड यशाबद्दल त्यांनी टीमचे अभिनंदनही केले.