सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरीही मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपलेली नाही.
मुंबई- सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरीही मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपलेली नाही. अजूनही ४७७पैकी ९ निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे हे निकाल जाहीर होणार तरी कधी, हे प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांसमोर कायम आहे. निकालांचा गोंधळ सुरूच असल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांंचे भवितव्य टांगणीला लागले आहे. एप्रिल महिन्यात कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतलेल्या ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या निर्णयामुळे यंदाचे निकाल अजूनही रखडलेले आहेत.
यंदा मुंबई विद्यापीठातून साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी हे पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांच्या तब्बल १७ लाख उत्तरपत्रिकांची तपासणी करायची होती. त्यामुळे मे महिन्यात उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग सुरू करण्यात आले. ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत स्कॅनिंगच्या वेळी गोंधळ झाल्याने तपासणीची प्रक्रिया उशिरा सुरू झाली.त्यामुळे जून महिना उजाडूनही विद्यापीठाने निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली नाही.
निकालाला लागलेला लेटमार्क आता विद्यार्थ्यांंना चांगलाच महागात पडला आहे. आतापयर्ंत जवळपास ४६८ निकाल विद्यापीठाने जाहीर केले असले तरीही त्यात मोठय़ा प्रमाणात गोंधळ आहे. लावलेल्या निकालात अनेकांना नापास करण्यात आले आहे. तर, काहींना शून्य गुण मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्यात याव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. त्यातच एक गोष्ट समोर आली आहे की, निकालाला लागलेल्या लेटमार्कमुळे विद्यापीठाने मॉडरेशन करणे टाळले आहे.
[EPSB]
[/EPSB]