‘बॉम्बे वेल्वेट’ला अपेक्षित यश न मिळाल्याने या चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग कश्यप चांगलाच नाराज झाला आहे.
मुंबई – रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि करण जोहर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘बॉम्बे वेल्वेट’ला अपेक्षित यश न मिळाल्याने या चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग कश्यप चांगलाच नाराज झाला आहे.
चित्रपटाच्या अपयशामुळे नाराज झालेला अनुराग बॉलीवूडला रामराम ठोकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर भारत सोडून तो पॅरिसला स्थायिक होणार असून पॅरिसमध्ये त्याने स्टुडिओ अपार्टमेंटही बुक केल्याचे वृत्त आहे.
२००३ मध्ये ‘पांच’ या चित्रपटातून अनुरागने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘देव डी’, ‘अग्ली’ आणि ‘गँग ऑफ वासेपूर’ या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.