गेल्या तीन वर्षांपासून चित्रपटसृष्टीमधून लांब राहिलेली ऐश्वर्या राय बच्चन लवकरच मणि रत्नम यांच्या चित्रपटातून बॉ़लीवूडमध्ये कमबॅक करणार आहे.
मुंबई – गेल्या तीन वर्षांपासून चित्रपटसृष्टीमधून लांब राहिलेली ऐश्वर्या राय बच्चन लवकरच मणि रत्नम यांच्या चित्रपटातून बॉ़लीवूडमध्ये कमबॅक करणार आहे.
याआधी ऐश्वर्या आणि अभिषेकने मणि रत्नम यांच्या ‘गुरु’ आणि ‘रावण’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ऐश्वर्याने बॉलीवूडमधील करिअरची सुरुवातही मणि रत्नम यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटाने केली होती. आराध्याकडे संपूर्ण लक्ष देण्यासाठी ती बॉलीवूडपासून काही काळासाठी दूर राहिली होती. मात्र आता तिने बॉलीवूडमध्ये पुनरागमन करायचे ठरविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ऐश्वर्या राय बच्चन ही संजय लीला भन्साळी यांच्या ‘गुजारिश’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. गेल्या तीन वर्षांपासून जरी ती चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली असली तरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ती हजेरी लावत असे.