महागाईच्या आगीत आणखी तेल ओतत मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट बस’ने १ फेब्रुवारीपासून रुपयाने भाडेवाढ करून प्रवाशांचा खिसा कापण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – महागाईच्या आगीत आणखी तेल ओतत मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट बस’ने १ फेब्रुवारीपासून रुपयाने भाडेवाढ करून प्रवाशांचा खिसा कापण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
रुपयांनी भाववाढ होणार असून मुंबई महापालिकेने १,६०० कोटी रुपयांच्या कर्जापैकी फक्त ४०० कोटी रुपये दिल्याने ही दरवाढ करण्याशिवाय बेस्ट परिवहन विभागाकडे पर्याय नसल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. त्यामुळे निवडणुकीनंतर ‘बेस्ट’चा जोर झटका सत्ताधा-यांना सहन करावा लागणार आहे.
एप्रिल २०१३ रोजी होणा-या दरवाढीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागू नये, यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडे १,६०० कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते. परंतु दीड वर्षापेक्षा अधिक काळ उलटला तरी केवळ ४०० कोटी रुपयेच कर्ज महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध झाले आहे. बेस्ट परिवहन विभागाचा आर्थिक डोलारा सध्या विद्युत विभाग रेटत आहे.
त्यातच सुटय़ा भागांच्या वाढत्या किंमती, इंधनाचे वाढते दर यामुळे ‘बेस्ट’ची आर्थिक कोंडी वाढली आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी बस भाडे वाढ हाच पर्याय असून १ फेब्रुवारीपासून किमान रुपयांनी बस भाडय़ात वाढ होणार आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१३ मध्ये होणारी भाडेवाढ १ फेब्रुवारी २०१५ मध्ये अटळ असून वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांना भाडेवाढीला सामोर जावे लागणार आहे.
या भाडेवाढीबाबत प्रशासनाने २ रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव बेस्ट समिती सदस्यांसमोर ठेवला आहे. १ एपिल २०१५ पूर्वी पालिका प्रशासनाने उर्वरित कर्जाची रक्कम दिल्यानंतर रुपयांनी भाडेवाढ होईल, असे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.