आरे कॉलनीमधील हल्लेखोर बिबळ्या पकडला गेला. मात्र, येथील धोका संपलेला नाही. हा धोका बिबळ्यामुळे नव्हे तर माणसाच्या सवयीमुळे आहे.
मुंबई- आरे कॉलनीमधील हल्लेखोर बिबळ्या पकडला गेला. मात्र, येथील धोका संपलेला नाही. हा धोका बिबळ्यामुळे नव्हे तर माणसाच्या सवयीमुळे आहे. एक बिबळ्या पकडल्यानंतर त्याची जागा आता दुसरा बिबळ्या घेणार हे नक्की. ४० दिवसांपासून बिबळ्याच्या हालाचालींवर देखरेख ठेवताना तज्ज्ञांना बिबळ्याच्या हल्ल्यांना चालना देणारी मानवी कृत्ये लक्षात आली आहेत. ही कृत्ये थांबली नाही तर हल्ल्याचा धोका कायम आहे.
आरेमधील हल्लेखोर बिबळ्या पकडण्यासाठी १४ कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. त्याचसोबत सीसीटीव्ही कॅमेरेही होते. या कॅमे-यामध्ये रात्रीच्या वेळी फिरणा-या बिबळ्यासोबतच पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी आलेल्या लोकांचाही वावर आढळला आहे. या ट्रॅपमध्ये एक सकाळी फिरायला आलेली व्यक्ती पुढे गेल्यानंतर अवघ्या तीस सेंकदात तिथे बिबळ्या आला होता, असे इम्रान उदार यांच्या टीमने सांगितले.
सामान्यांना ज्या भागात प्रवेश नाही त्या भागातही रात्री अंधार पडेपयर्ंत लोक फिरत राहतात, असे आढळले आहे. या फिरणा-या लोकांना जबरदस्ती बाहेर काढण्याची वेळ पोलिसांवर येते. आरेत फिरायला येणारे मुंबईकर अनेकदा आपल्यासोबत कुत्रे घेऊन येतात. त्यामुळे बिबळ्याच्या हल्ल्याचा धोका वाढतो. या फिरायला येणा-या लोकांच्या हातात केवळ एखादी लहानशी टॉर्च असते. अशा परिस्थितीत बिबळ्या प्राण्यावर हल्ला करू शकतो. घाबरून कोणी पडले, त्यांना लागले, बिबळ्याचे नखही लागले तरी त्याचा दोष बिबळ्यावर येऊ शकतो.
सूर्यास्तानंतर बिबळ्या फिरू लागतो. त्यामुळे सूर्यास्तानंतर सूर्योदयापयर्ंत लोकांनी आरेमध्ये फिरायला येऊ नये, अशी अपेक्षा मानद वन्यजीव रक्षक मयूर कामत यांनी व्यक्त केली. फिरायला येताना किमान एक काठी सोबत बाळगावी, मोठी टॉर्च असावी, मोबाइलवर मोठय़ा आवाजात गाणी ऐकावी, असेही त्यांनी सांगितले.बिबळ्या पकडताना इतर प्राण्यांना त्रास होऊ नये आणि त्यातून मानव-प्राणी संघर्ष निर्माण होऊ नये यासाठी वन्यजीव तज्ज्ञांच्या टीमसोबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व ठाणे वनविभाग रेस्क्यू टीम यांचा महत्त्वाचा वाटा आहे. बिबळ्या पकडण्यासाठी सगळ्यांनीच रात्रीचा दिवस केला होता. या बिबळ्याच्या हल्ल्यात आणखी एखादी जरी व्यक्ती जखमी झाली असती तरी प्रचंड असंतोष निर्माण झाला असता. त्याआधी हा बिबळ्या पिंज-यात अडकणे गरजेचे होते, असे टीमकडून सांगण्यात येते.
[EPSB]
एका काळात जगातले सर्वात महागड्या प्रजातीचे मानले जाणारे तिबेटी मास्टीफ श्वानांच्या किमतीत मोठी घट झाली आहे. या कारणाने या महागडय़ा श्वानांना तिबेट आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये बेवारस सोडण्याची वेळ आली आहे.
[/EPSB]