एस. टी. कर्मचा-यांच्या संपामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांचे हाल होत असून, या प्रकरणी सरकारने तातडीने एस.टी.कर्मचा-यांशी चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.
मुंबई- एस. टी. कर्मचा-यांच्या संपामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांचे हाल होत असून, या प्रकरणी सरकारने तातडीने एस.टी.कर्मचा-यांशी चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. एस.टी.चे कर्मचारी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी मागील अनेक दिवसांपासून संघर्ष करीत असताना सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यामुळेच त्यांच्यावर संपासारखे हत्यार उपसण्याची वेळ आली आहे.
या कर्मचा-यांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज राज्यातील प्रवाशांचे हाल झाले नसते असे मुंडे म्हणाले. एस.टी.कर्मचा-यांच्या मागण्या अतिशय रास्त असून, या बाबत मुख्यमंत्र्यांनी सन्मानजनक तोडगा काढुन प्रवाशांचे हाल वाचवावेत तसेच कर्मचा-यांनादेखील योग्य न्याय द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडे केली. राज्यातील संगणक परिचालकांच्या सुरू असलेल्या आंदोलनाकडेहीमुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधुन या आंदोलनाचीही दखल घेऊन या संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली.
रावतेंना संप मिटवायचा आहे का चिघळवायचा आहे – ना.मुंडे
एस.टी. कर्मचा-यांच्या संपामुळे राज्यातील जनतेचे हाल होत असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते हे करीत असलेले वक्तव्य पाहता त्यांना संप मिटवायचा आहे का चिघळवायचा आहे ? असा प्रश्न पडला असल्याचा सवाल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी नंतर पत्रकारांशी बोलतांना केला.
[EPSB]
[/EPSB]